संजय पाटील (Pcmctahalka.in) दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास 24 तास शिल्लक राहिलेले असतानाच दिल्लीतील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना भाजपकडून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला.
भाजपकडून फोन आल्याच्या आणि 15 कोटी रुपयांच्या ऑफर केल्याच्या AAP नेत्यांच्या दाव्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. AC
टीम अरविंद केजरीवाल यांच्या घरी का पोहोचली?
एसीबीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अरविंद केजरीवाल आणि आपचे आरोप गंभीर आहेत. एसीबीची टीम अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली आहे. त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी अरविंद केजरीवाल सहकार्य करत नाहीत. टीमला एसीबीच्या कायदेशीर टीमशी बोलण्यास सांगितले जात आहे. याप्रकरणी रवींद केजरीवाल हे तक्रारदार असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले. त्यांनी आरोप केले असतील तर ही जागा त्यांच्यासाठी सोयीची आहे म्हणून एसीपी त्यांच्या घरी आले आहेत. संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जात असून अरविंद केजरीवाल यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची दखल घ्यावी लागली. असा आरोप त्यांनी केला आहे. त्या वक्तव्याच्या आधारेच पुढील एफआयआर नोंदवला जाईल किंवा अन्य कारवाई केली जाईल
दुसरीकडे एसीबीचे पथक घरी पोहोचताच, आम आदमी पक्षाच्या कायदेशीर पथकातील आणखी काही वकीलही अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. प्रत्यक्षात, भाजपच्या तक्रारीनंतर एलजीने एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आप नेते संजय सिंह एसीबी कार्यालयात पोहोचले आहेत आणि त्यांची तक्रार देत आहेत. संजय सिंह यांचाही जबाब एसीबी कार्यालयातही नोंदवला जाऊ शकतो. तसेच, त्यांनी केलेले आरोपी एबीसी नोंदवून घेणार आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी एसीबीचे पथक दाखल झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कायदेशीर कक्षाचे प्रमुख संजीव नसियार म्हणाले की, " गेल्या अर्ध्या तासापासून येथे बसलेल्या एसीबी टीमकडे कोणतेही कागदपत्रे किंवा सूचना नाहीत. ते सतत फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत. जेव्हा आम्ही चौकशीसाठी नोटीस किंवा अधिकार मागितला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे काहीही नसल्याचे म्हटले आहे.