पुणे प्रतिनिधी -: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी येणाऱ्या सुमारे एक हजार ८० दिंड्या आणि पालख्यांचे प्रस्थापन होत असते,
दरवर्षी राज्याच्या विविध भागातून हजारो दिंड्या आणि पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. या दिंड्यांमधून पायी येणारे वारकरी हे गरीब आणि कष्टकरी असतात. त्यांना पायी प्रवास करताना आरामाची देखील तेवढीच गरज, हीच गरज ओळखून डोणजे ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने आषाढी वारी निमित्त गोर्हेकर संस्था, आंळदी देवाची (दिंडी क्र ११) मधील वारकरी रहाण्यासाठी मोफत ६५ तंबु दिले यावेळेस गोर्हेकर संस्थेचे पदाधिकारी व डोणजे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मिळालेल्या तंबूंमुळे दिंड्यातील वारकऱ्यांचा पंढरीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे,
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दादा पारगे यांचा समवेत गावकरी उपस्थित होते