आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 वाशीम

जुने फेरफार कसे काढावे ?

शरद लाटे  39   07-03-2025 09:26:02

पुणे (Pcmctahalka.in) जमिनीच्या संदर्भातील व्यवहारात किंवा अधिकारांत बदल झाल्यास जुने फेरफार काढून टाकावे लागतात. त्याचबरोबर फेरफाराची प्रक्रिया करताना एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी जुने फेरफार काढण्याची आवश्यकता असते. जुने फेरफार त्या त्या वेळी रद्द केले नाही तर पुढे जमिनीच्या किंवा शेतजमिनीच्या व्यवहारांत व्यत्यय येतो. त्यासाठी ते जुने फेरफार कसे काढावे (June ferfar kse kadhave) तसेच फेरफार हि प्रक्रिया काय असते, याविषयीची माहिती पाहुया.

फेरफार म्हणजे काय ?

फेरफार म्हणजे एखाद्या व्यक्तिच्या जमीन अधिकार अभिलेखात झालेले बदल होय. त्या सर्व बदलांची नोंद फेरफारात केली जाते. फेरफार हा एक कायदेशीर नमुना आहे. जो ‘गाव नमुना क्रमांक ६’ तसेच ‘नोंदीचा उतारा’ म्हणूनही ओळखला जातो. गाव नमुना क्रमांक ६ चे ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’ असे चार प्रकार पडतात. या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारसदार हक्क व शेतजमिनीवर बोजा लावल्याच्या नोंदी ठेवल्या जातात. फेरफार हा सातबाराचा महत्वाचा भाग आहे. सातबाऱ्यावरील नोंदी फेरफार प्रमाणित असतात. त्यांत कर्ज, खरेदी-विक्री किंवा क्षेत्र रूपांतरणाच्या नोंदणींचा समावेश होतो. 

जमिनीच्या संदर्भातील व्यवहारात किंवा अधिकारांत बदल झाल्यास जुने फेरफार काढून टाकावे लागतात. त्याचबरोबर फेरफाराची प्रक्रिया करताना एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी जुने फेरफार काढण्याची आवश्यकता असते. जुने फेरफार त्या त्या वेळी रद्द केले नाही तर पुढे जमिनीच्या किंवा शेतजमिनीच्या व्यवहारांत व्यत्यय येतो. त्यासाठी ते जुने फेरफार कसे काढावे (June ferfar kse kadhave) तसेच फेरफार हि प्रक्रिया काय असते, याविषयीची माहिती पाहुया.

 

प्रॉपर्टी संदर्भातील कायदेशीर कामांत तुम्हांला नो ब्रोकरचे प्रोफेशनल लीगल सर्विस योग्य मदत करेल

फेरफार रद्द करण्याचा अधिकार प्रांताधिकारी किंवा उप-विभागीय अधिकारी यांना असतो. याकरीता तलाठी व तहसीलदाराकडून तुमच्या अर्जाचा संपूर्ण अहवाल मागवला जातो. सर्वरीतीने तुमच्या अर्जाची पडताळणी होते मग जुने फेरफार रद्द करून नवे नोंदवले जातात. जर फेरफारांत वेळीच बदल केला गेला नसेल किंवा एखादी चूक बराच काळ लोटल्यानंतर तुमच्या लक्षात आली असल्यास तुम्हाला उशीर माफीचा अर्ज प्रस्तुत करावा लागतो. विलंब झाल्यासंदर्भात तुम्ही अर्जात नमूद केलेले कारण किंवा पुरावे योग्य व सत्य असावेत. तरच, तुमचा अर्ज विचारात घेऊन प्रांताधिकारी तुमची ‘विलंब माफी’ मंजूर करतात.

आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने जुन्या-नव्या फेरफार माहितीची नोंद ठेऊ शकता. त्यासाठी शासनाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे. या वेबसाइटवर महाराष्ट्र महसूल विभागाने ‘आपली चावडी’ हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.